Saturday, December 18, 2010

'Shree Kanthakoop Paashan'

On Thursday, 16th December 2010, Param Poojya Sadguru Shree Aniruddha Bapu, Nandaai & Suchitdada performed the First Poojan of 'Shree Kanthakoop Paashan' at Shree Harigurugram at 7.30pm. The Poojan videos are now uploaded in the Video Gallery at www.manasamarthyadata.com/vgallery.php

Every devotee can perform this Poojan at their home. The booking for Poojan can be done at 5th Floor, Happy Home and respective Upasna Centers.

Saturday, December 11, 2010

अनिरुद्ध पौर्णिमा २०१०



हरी ओम,


भरपूर दिवस झाले गप्पा मारून नई? कसे जात आहेत दिवस पत्ताच लागत नाही. म्हणता म्हणता २०१० वर्ष संपत आलं. अनिरुद्ध पौर्णिमेच्या गडबडीत दिवस पटापट जात होते. अनिरुद्ध पौर्णिमेची परेड अतिशय छान झाली. सर्वांकडून खूप कौतुक झाले परेडचे (श्रीराम). ह्या वर्षी परेड ची संख्या तर अफाट होती. तब्बल ७५० DMVs नी ३० प्लाटून मधून मार्चपास केले आणि ह्यात सर्वात जास्त संख्या होती ती मुंबई बाहेरील DMVs ची आणि ते सुद्धा लहान लहान गावातून सुद्धा बरीच मंडळी आली होती. संस्थेतर्फे कोल्हापूर मेडिकल कॅंप जिथे आयोजित केला जातो त्या गावातील मुलेसुद्धा परेड मध्ये सहभागी होती. एकाच ध्येयाने प्रेरित होऊन; yes मला माझ्या बापूला सल्यूट  करायचा आहे. आणि म्हणूनच तो भावाचा भुकेला देव पण त्याच्या बाळांना सल्यूट करतो.   

परेड करताना बापूंचे शब्द ' बाळानो तुम्ही परेड करता म्हणून मी सल्यूट करतो' हे वाक्य आठवत होता आणि तो क्षण आला. बापूंच्या समोरून त्यांना सल्यूट करत जाताना होणारा आनंद तर अवर्णनीयच. तो फक्त अनुभवता येतो. शब्दात मांडणे कठीण. सगळेच्या सगळे परेड केलेली मंडळी हेच उत्तर देतील आणि ते उत्तर शोधण्यासाठी तरी प्रत्येकाने एकदा तरी परेड करावीच. त्या बापूरायाला  सल्यूट  करणे, त्याचा कडून तो सल्यूट घेणे म्हणजे अगदी out of this world feeling असते. 

ह्या वर्षी तर सर्वत्र परेड एकदम छा गई. कारण अनिरुद्ध पौर्णिमेनंतर होणार्या अधिवेशनामध्ये तर श्री समीरदादानी घोषणा केली की प्रत्येक उपासना केंद्रावर परेड ग्रुप सुरु व्हायला हवे आणि तिथे फक्त परेडच नव्हे तर रेस्क्यू प्रॅक्टीस, फायर फायटिंग ट्रेनिंग, स्पोर्ट्स हे सर्व असणार आणि एक रविवार संस्थे तर्फे आयोजित निष्काम भक्तिमय सेवेसाठी राखीव असणार. तसेच ५ वा रविवार सुट्टीचा. मग काय मज्जाच मज्जा. आज पर्यंत परेड म्हणजे बर्याच जणांना १-२-१ असेच वाटायचे पण आता कळेल की काय काय धम्माल असते.     

अधिवेशनात घोषणा झाल्यावर तर ह्या रविवार पासून मुंबईत जोगेश्वरी व मरोळ येथे २ नवीन परेड केंद्र सुरु देखील झाली आणि घोषणा व्हायच्या आधीच परेड मार्चपास बघून पार हैदराबाद आणि लखनौ कडून विचारणा सुद्धा झाली. लवकरच तिथे पण बापू कृपेने परेड सुरु होयील.      

हीच तर गम्मत आहे ना जितकं देता तुम्ही त्याच्या किती तरी पटीने जास्त मिळते. हा बापू फक्त देण्यासाठी आलाय. बापूला आवडणाऱ्या ९ थेंबांमधे परमेश्वराच्या कार्यासाठी व सेवेसाठी परिश्रम करताना येणाऱ्या घामाचे थेंब ह्यांचा पण समावेश आहे.

शेवटी प्रश्न ज्याचा त्याचा आहे, 'त्या'ला आवडणाऱ्या गोष्टी द्यायच्या की नाही !! 


(अनिरुद्ध पौर्णिमा २०१० ची मार्च पास बघण्यासाठी www.manasamarthydata.com ह्या website वर भेट द्या)

Friday, November 5, 2010

श्रीलक्ष्मीजी की आरती

मा तू लक्ष्मी कृपा करो, करो हृदय मे बास,
मनोकामना सिद्ध करो, याही हमारी आस I
हाथ जोड बिनती करू, तुम घर करो निवास,
मनसामार्थ्य से पूर्ण भरो, यही भक्त की आस II

बोलो त्रिपुरसुन्दरी, कमला कामेश्वरी नंदामाता की जय II

ओम जय लक्ष्मी माता, मैया जय नंदामाता,
निसदिन करे जो तेरी आरती, सुख संपती पाता,
ओम जय नंदामाता II १ II

तू ब्रह्माणी, तू रुद्राणी, तू कमला माता, मैया तू कमला माता,
सूर्य चंद्र तेरी करते पूजा, ऋषी तेरे गुण गाता II २ II

तू ही अणिमा, तू ही महिमा, तू गरिमा माता, मैया तू गरिमा माता
सारा जग है तेरे अधिना, तेरी आरती गाता II ३ II 

कमलबासिनी, कमलानयनी, कमलांगी माता, मैया तू कमला माता
कमल से कोमल तेरा मनवा, दुख हरता माता II ४ II

जब जब प्रभू ने जनम लियो, तुने की सेवा, मैया तुने की सेवा
सीता, लक्ष्मी बनी पार्वती, तू नंदामाता II ५ II

मै नही जानू किस बिधि पूजा, मै मूरख माता, मैया मै मूरख माता
कृपा करो जगजननी, जगवाहिनी माता II ६ II

चार भुजा शोभित तुज अंगा, तू गंगा माता, मैया तू गंगा माता
अभय हस्त से कृपा तू करियो, द्वार खडा माता II ७ II

जो कोई करता तेरी सेवा, पाप उतर जाता, मैया क्षमादान पाता 
आनंद हिय मोहे उपजे, वैभव निधी पाता II ८ II 

श्री सुबीज ये यंत्र, जो सुमरे माता, मैया जो पूजे माता
घर को स्वर्ग बनाये, नारायणी माता, ये श्रीनंदामाता II ९ II

ओम जय लक्ष्मी माता, मैया जय नंदामाता,
निसदिन करे जो तेरी आरती, सुख संपती पाता,
ओम जय नंदामाता II

II दोहा II

अभयदायनी, भवतारिणी, आदिशक्ती तू मात
दया करो मुझ दास पर, आस धरू दिनरात,
माता लक्ष्मी शारदा, जो जन आते पास,
उनके दुख तुम दूर करो, करो समूल विनाश I 
बोल त्रिपुरसुन्दरी, कमला कामेश्वरी नंदामाता की जय II

परेड फौंडेशन डे- भाग २

सर्वात अगोदर एक मोठा सॉरी. ब्रेक के बाद म्हटले होते. तो ब्रेक खूपच लांबला. फौन्डेशन डे च्या गमती जमती राहून गेल्या पण एक बरे झाले की इतक्या दिवसांनंतर पुन्हा त्या आठवण्याची संधी मिळाली. इथे एक मज्जा म्हणजे सगळेच जण एकदम पारंपारिक पेहरावात होते. मुली साड्या, नववारी, तर मुले, झब्बा, लेंगा, धोतर अशा वेशात. सगळ्यांना नेहमी परेड गणवेशात पाहण्याची सवय त्यामुळे ह्या पेहरावात सर्वाना बघून खूपच मज्जा वाटली. तसेच बापू नेहमी सांगतात जसा कार्यक्रम तसा वेश, त्याप्रमाणेच सगळे तयार होऊन आले होते.  दिवसाची सुरुवात येणाऱ्या dmvs च्या नोंदणीने व चहा नाश्त्याने झाली. ते होई पर्यंत बापूंचे आगमन झाले.
मस्त सजवलेल्या पालखीतून बापूंना दिंडीतून घेऊन आलो. गेट १ पासून गेट ४ पर्यंत रस्त्यावरून दिंडी जोरदार आली. गेट ४ वर बापूंचे औक्षण करून आत आले ते पुन्हा एकदा बहारदार पणे जल्लोषात स्वागत झाले. आत hall मध्ये स्टेजवर विराजमान झाले. त्या नंतर पादुका पूजन ला सुरुवात झाली पादुकापूजन सांगणारे पण DMV व करणारे पण. पादुका पूजन झाले नंतर कावड मधून वाजत गाजत बापुंसाठी लड्यांचा नैवेद्य आणला गेला. पुन्हा एकदा धम्माल नाचले सगळे. ह्या वेळी तर समीरदादा, पौरससिंह व स्वप्नीलसिंह पण हजर होते त्या मुळे तर आणखीन धम्माल. नैवेद्य अर्पण झाल्यावर समीरदादा, पौरससिंह व स्वप्नीलसिंह ह्यांनी मुलां मध्ये मिसळून धम्माल केली. समीरदादांना पाणी आणू का म्हणून एका सरांनी विचारले तर दादांनी मस्त उत्तर दिले. ते म्हणाले की मला तहान लागली तर मी घेईन पण इथे मला वेगळी treatment देऊ नका. आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायला हवे की बापू, नंदाई आणि सुचीतदादा एका बाजूला व आपण सगळे एका बाजूला. इथे ते तिघे सोडून कोणीच मोठा नाही. सगळे एकच लेवेल चे आहोत. नंतर मुलांशी गप्पा मारताना ते म्हणाले की तरुण पिढीने समोर येऊन जवाबदारी घ्यायला शिकायला हवी, त्यांनी पण मोठे व्हायला हवे. मोठे म्हणजे जवाबदारी घेऊन काम यशस्वीपणे पार पाडून दाखवणे. तिथे दुसर्या बाजूला तर स्वप्निलसिंह आणि पौरससिंह ची दे धम्माल चालू होती आपल्याच वयाच्या मुलां मध्ये ते इतके मिसळून गेले होते की जवळ जवळ दोन गट पडून गेले होते. तिथून पौरससिंह काही तरी बोलले की स्वप्नीलसिंह चे उत्तर तयार आणि त्यांनी काही बोलायच्या आत पौरससिंह चे उत्तर तयार. जाम एकमेकांची खेचत होते आणि त्यात मुलं पण सहभाग घेत होती आणि एकच हास्यकल्लोळ उठत होता. बेचारे पठण करणारी मंडळी वाट बघत होती की आम्ही कधी सुरु करायचे पण आमची मस्ती काही थांबेना शेवटी दादांनी सांगितल्यावर पठणाला सुरुवात झाली. आदिमाता शुभंकर स्तोत्र, आदिमाता अशुभनाशिनी स्तोत्र, दत्तमाला मंत्र, गुरुमंत्र, गुरुचरित्र अध्याय १४, हनुमानचलिसा, दत्तबावनी, ह्यांचे पठण झाले. एका बाजूला चरखा सेवा सुरु होतीच. त्यानंतर सत्संग झाला. सत्संग च्या वेळी पुन्हा धम्माल. दे दणादण नाचत होते सगळे. प्रत्येक उत्सवात DMV म्हणून सेवा करताना ह्या मुलांना क्वचितच कधी गजरांवर नाचायची संधी मिळते. ती संधी फक्त वर्षातून एक वेळेला मिळते आणि तिचा पुरेपूर फायदा मुले घेतात. दुपारी जेवणाच्या वेळी जेवणाबरोबरच पुन्हा एकदा वाजत गाजत कावड मधून गोधड्यांचा नैवेद्य बापू, आई, दादांना अर्पण करण्यात आला. संध्याकाळ झाली आणि घोरकश्तोधरण स्तोत्र पठाणाची वेळ झाली. बाहेरची भक्त मंडळी पण यायला लागली. पठण सुरु झाले आणि मुलं पण हळू हळू जेऊन यायला लागली. जेऊन फ्रेश होऊन मुलं पठणाला बसली. भक्त मंडळींचे येणे जाणे चालू होतेच. त्यांची बसायची व्यवस्था, दर्शनाची रंग, information hub वर त्यांना नेऊन माहिती सांगणे ह्यात मुलं पुन्हा एकदा रंगून गेली. तेवढ्यात निरोप आला की आई येते. पुन्हा चैतन्याचे वातावरण. सगळेच एकदम सज्ज झाले. आणि नंदाई सुचीतदादांबरोबर आली. dmvs ची स्वयंशिस्त पुन्हा एकदा अनुभवली. आई येण्याचा आनंद जेवढा तेवढाच तिला आपल्यामुळे काही त्रास होऊ नये म्हणून ही काळजी पण. आई व दादांनी स्तगेवर येऊन दत्तबाप्पा चे दर्शन घेतले. पादुकांना केलेल्या लडयांचे लोड व गादी तसेच, दत्ताबाप्पा, बापू, आई, दादांच्या, फोटोना घातलेले लडयांचे हार, ह्यावरून आई ने हाथ फिरवला, खूप खूप खुश होती माझी आई तेव्हा. आम्हा सर्वाना म्हणाली की तुमच्या efforts चे हे फळ आहे. तिचे हे शब्द ऐकून तर आम्ही सगळे सातव्या स्वर्गात पोचलो. पण लगेच खाली यावे लागले कारण आई परत जायला निघाली तर तिला रांगोळी आणि सर्व दाखवायचे होते. प्रवेशद्वारावारचे गोधाद्यांचे व जुने ते सोने मध्ये द्यायच्या साड्यांचे तोरण बघून तर ती जाम आनंदली. म्हणाली की आता तुम्हाला आपल्या संस्थेचे कार्य कळले आहे. तिच्या त्या आनंदात आम्ही इतके हरखून गेलो की दुसर्या बाजूला असलेले information hub दाखवायचे राहून गेले. आई परत गेली आणि मग लक्षात आले आणि सगळेच चुकचुकले. पण तेवढ्यात सगळ्यांनी एकमेकांना बजावले की बापू आल्यावर अजिबात विसरायचे नाही. घोरकश्तोद्धरण स्तोत्र पठण संपले आणि पुन्हा एकवार सत्संगाची मंडळी स्टेजवर बसली. पहिले २ अभंग झाले आणि बापू येणार ह्याची चाहूल लागली. मग काय सगळीच मज्जा. कोणाचे सत्संगात लक्ष लागेना. सगळे जण बापू यायच्या दिशेला तोंड करून बसले. सत्संग तर actually थांबवला. जसे बापू येणार असे कळले तसे लगेच जय जय रामकृष्ण हरी चा गजर चालू झाला आणि बापूंचे hall मध्ये आगमन होताच अनिरुद्ध आला रे आला चा गजर सुरु झाला दिवाळी दसरा काय असतो ते कळले. पुन्हा एकवार बापूंनी स्वतःचे ब्रीद कायम ठेवले. तुम्ही एक पाऊल उचलले की पुढची ९९ पावले तो येतो. आम्ही फक्त त्याला जे हवे आहे ते देण्याचं थोडासा प्रयत्न केला आणि तो आमच्यासाठी पुढची सगळी पावले धावत आला.

बापूंचे आगमन झाले आणि ते आत गेले. आम्हाला काही कळेना काय ते. आम्हाला आधी धाकधूक होती की आई जशी घाईत आली तसेच हे पण घाईत येतील आणि जातील. पण हे आले ते सरळ आतच गेले ते पण येतो असे सांगून. आम्ही सगळे भांबावून गेलो. तेवढ्यात लगबगीने सोफा स्टेजवर मांडण्यात आला. सर्व तयारी झाली. ओहो! अहाहा! मग प्रकाश पडला बापू आले ते घाईने परत जाण्यासाठी नव्हे तर आम्हावर छप्पर फाडून प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी. बापू थोड्या वेळाने स्टेजवर येऊन बसले आणि म्हणाले की disaster चा अर्थ काय. त्यांनी उदाहरण काय द्यावे? सगळे सत्संग ऐकायला मंडळी बसली आहेत, सत्संग करणरी मंडळी पण तयार आहेत आणि त्यात जर मी म्हटले की मी (बापू) गाणं म्हणणार की जे होणार ते disaster. बापू पण ना लबाडी काही केल्या सुटत नाही त्यांची. आणि वरून त्यांच्या सगळ्या लहान-लहान पोरांनी आयोजित केलेला कार्यक्रम म्हटले की ते पण आमच्या सारखेच लहान झाले होते. तशीच मस्ती करत होते. पण तेव्हाच typical बाबांप्रमाणे सर्वाना मार्गदर्शन पण केले. ते म्हणाले की स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्याचा जीव वाचवायचा हे योग्य नाही. उदा: परीक्षेसाठी जात आहोत आणि रस्त्यावर कोणाचा अपघात झाला असेल तर त्यावेळी परीक्षा देणे महत्वाचे. पण तेच जर सिनेमाला जात असताना असे झाले तर त्यावेळी त्या अपघात स्थळी मदत करणे आवश्यक.                

नंतर सत्संग सुरु झाला आणि एकच धम्माल उडाली. आई चा जोगवा, बापू के संग करो माखन की चोरी ह्या गजरावर तर जी धम्माल केलिया हे ना की फक्त तो hall आणि ती बिल्डींग खाली यायचे बाकी होते. (हे सगळे गजर/ अभंग आपण पुन्हा ब्लोग मधून बघणार आहोतच) 'जे न आले ते तसेच राहिले' प्रमाणे जे नाही आले त्या दिवशी आमंत्रण देऊन सुद्धा त्यांची गत झाली. इतकी मज्जा कधीच अनुभवली नव्हती. आजी सोनियाचा दिनू ह्या प्रमाणे सर्वांची गत झाली आणि ह्या सर्वांवर कळस म्हणजे बापूंचे सत्संगच्या शेवटी म्हटलेले वाक्य- कधी दमलात, कंटाळलात, निराश झालात, depression येते असे वाटले की परत परत मनात एकच वाक्य आठवायचे, स्वताच्या कानांनी स्वतःच हे वाक्य ऐकायचे- I Love You

ह्या वाक्य नंतर जो जल्लोष झाला तो तर सांगायलाच नको. आणि अजून पण द्यायचे बाकी होते म्हणून की काय सर्व परेड DMV न बोलावून बापू म्हणाले की असेच तरुण राहा कायम.

त्या नंतर बापूना जाताना information hub वर नेऊन सर्व माहिती देण्यात आली. परेड व्यतिरिक्त मुले अजून जे काही उपक्रम करतात ते सुद्धा सांगितले. पिकनिक ला जाणे सेवेत भाग घेणे ई.

अजून काय लिहू ह्या दिवसा बद्दल? ज्यांनी तो दिवस अनुभवला त्यांच्या तोंडून ह्या दिवसाची गम्मत ऐकायला मिळाली तर जरूर ऐका. तुम्ही स्वतः पण तिथेच होता असे वाटल्या शिवाय राहणार नाही आणि हेच बापूंना अपेक्षित आहे, आपल्याला मिळालेला आनंद इतरांना वाटायचा आणि स्वतः त्यातून पुन्हा आनंदी व्हायायचे.

Friday, October 15, 2010

अष्टमीचा होम

आजच्या अष्टमीच्या शुभ दिवशी आपल्याला घरी पुढील प्रमाणे यज्ञ करायचा आहे.

साहित्य: तांदूळ, ताम्हण, कापूर.

पूजाविधी: प्रथम तांदुळाचे स्वस्तिक काढून त्यावर ताम्हण ठेऊन त्यात २,३ मुठी तांदूळ पसरावेत.
              नंतर त्यावर ८ कापराच्या वड्या ८ दिशांना मांडाव्यात (ठेवाव्यात) व एक कापूर मध्यभागी ठेवावा व प्रथम तो प्रज्वलित करावा व        
              पुढील जप (२७, ५४, १०८) वेळा म्हणावा.
            
        १.   सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
              शरण्ये त्र्यम्बके गौरी  नारायणी नमस्तुते ||
        
       २.  ओम श्री आदिमाता नमो नम: ||
       
       ३.  ओम मनसामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नम: ||
      
      ४. ओम श्री आल्हादीने नन्दाये संधीन्ये नमो नम: ||
     
      ५. ओम नमो विश्वम्भरा (आपल्या कुलदेवतेचा मंत्र) श्री गुणसरिता नमो नम: ||

प्रत्येक वेळी एकेक कापूर ताम्हनाच्या मधोमध अग्नीत टाकणे. जप संपेपर्यंत अग्नी शांत होऊ देऊ नये.
जप संपल्यानंतर साष्टांग नमस्कार घालणे.
मग ताम्हण हळू उचलून बाजूला करणे व स्वस्तिक काढलेले तांदूळ गोळा करून त्या ताम्हनात ठेवणे.
ते तांदूळ दसऱ्यापर्यंत देव्हाऱ्यात सफेद कपड्यात बांधून ठेवणे व दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करणे.

Monday, October 4, 2010

AADM परेड फौन्डेशन डे

परेड विषयी बोलता बोलता मधेच गणपती बाप्पा आले आणि मग सुरु झाली परेड फौन्डेशन डे च्या तयारीची धामधूम. दर वर्षी आम्ही हा दिवस साजरा करतोच. पण तो असतो परेड DMVs साठीच फक्त. आणि ते सुद्धा मस्त पैकी सत्संग करायचा, खायचे आणि धम्माल करायची. पण ह्या वर्षीची गोष्टच निराळी. ह्या वर्षी दर वर्षी प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा आखून परवानगी साठी विचारणा केली तेव्हा एक आनंदाचा धक्का देण्यात आला. हा कार्यक्रम पूर्ण दिवसभराचा आणि हरीगुरुग्राम येथे करायचा असा निरोप आला. त्या साठी काय कार्यक्रम ठेवायचा हे ठरवण्यात आले. पूर्ण कार्यक्रम भक्तीमयच असणार हे वेगळे सांगायलाच नको. सकाळी ध्यानमंत्र, अह्निक, पादुका पूजन; दुपारी आदिमाता शुभंकर स्तवन, अशुभ्नाशिनी स्तोत्र, दत्तबावनी, गुरुचरित्र १४ वा अध्याय, दत्तमाला मंत्र, हनुमान चालीसा, गुरुमंत्र आणि मग सत्संग; तर संध्याकाळी घोरकष्टतोधोरण स्तोत्र पठण, सत्संग व महारती असा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम होता. परेडची सुरुवात २३ सप्तेम्बर२००३ पासून झाली. त्यामुळे २६ तारखेच्या रविवारी कार्यक्रम करण्याचे ठरले. मात्र बापुंची लीला नेहमी निराळीच. त्या दिवशी जागा उपलब्ध नसल्याने ३ तारखेला कार्यक्रम करायचे ठरले. ह्यात लीला ती कशी असा प्रश्न पडला काय? अहो विसरलात? ३ ऑक्टोबर रोजीच बापूनी १३ कलमी योजना जाहीर केली होती. आणि नेमका हाच हा दिवस मिळाल्यामुळे तर सर्वांचा उत्साह द्विगुणीत झाला. संपूर्ण सजावटी मध्ये १३ कलमातील एक एक कलम घ्यायचा प्रयत्न केला गेला आणि तीच थीम वापरली- दत्तबाप्पा, बापू, आई, दादा, व आद्य पिपादादाना लडयांचे हार, प्रवेशद्वारावर गोधडीचे तोरण, मक्याच्या कुंड्यांची मार्गदर्शिका, कागदाच्या लगद्यापासून केलेल्या गुढ्या, मधल्या वेळेत चालवण्यासाठी चरखे आणि महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्याची थीम होती, 'काय गोड गुरूची शाळा'. खर आहे ह्या शाळेची गोडी काही निराळीच, ती स्वतः अनुभवल्याशिवाय सांगून कळणारच नाही. काय नाही ह्या शाळेत? अध्यात्म आणि प्रपंच करून संपूर्ण जीवनविकास कसा घडवायचा हेच इथे शिकवले जाते आणि ते सुद्धा डायरेक्ट परमात्म्याकडून. आणि प्रवेश परीक्षा नाही की काही नाही. फक्त एकच अट- मला माझे प्रारब्ध बदलायचे आहे. बास्स. अडमिशन फी किती? २ पैसे!! काय झाले? चक्कर आली का? अहो २ पैसे म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. ह्या २ पैशांची किंमत साई बाबांच्या वेळी जेवढी होती तेवढीच आज पण आहे. आहे की नाही एकदम मस्त.     

तर अश्या ह्या धम्माल सोहळ्याची तयारी पण एकदम जय्यत सुरु होती गेले अनेक दिवस. प्रत्येक DMV तितक्याच उत्साहात तयारीला लागला होता. लड्या बनवण्यात, मका लावण्यात, गोधडी शिवण्यात सगळेच व्यस्त होते. कारण एकच- सर्वाना माहित होते, त्याला बोलवायचे कसे आणि त्याला काय हवाय आणि काय केले की तो आपोआप खेचला जायील, हे गुपित आम्हाला कळले होते. कसले गुपित म्हणता? ऐकायचे आहे? ते फक्त आम्ही आणि बापू ह्यांच्या मधलेच आहे बर का!
हा हा हा.. मस्करी केली. आपल्याकडे कसलीच गुपित नसतात. जे काही आहे ते पूर्ण transparent. भक्ती आणि सेवा ह्या मुळेच तो सदैव आनंदित होतो आणि जिथे त्याला हे आढळते तिथे तो धावत येतो आणि भरभरून देतो. जितका घाम सेवेत गाळला असेल तितक्या जास्त पटीत हा प्रेमाच्या वर्षावात न्हाऊ घालतो. प्रत्येक DMV प्रत्येक सेवेत हिरीरीने भाग घेतो. प्रत्येक सेवेच्या वेळी AADM च्या गणवेशात उभा असतो. इतर भक्त, सेवेकरी अगदी छान नटून थाटून येतात. पण हे DMV मात्र त्यांना दिलेल्या कामाच्या आड काहीच येऊ देत नाहीत. आपापले काम, कॉलेज, ऑफिस घर सांभाळून ही परेडची मुलं दर रविवारी न चुकता परेड ग्राउंड वर हजर असतात. परेड प्राक्टिस, रेस्क्यू प्राक्टिस करतात.

मैदानात शिकलेले टीमवर्क ह्या सोहळ्याची तयारी करताना पण उपयोगी आले. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पणे नियोजन करून करण्यात आली. त्या साठी वेगवेगळ्या कमिटी बनवल्या गेल्या. दिंडी, पादुकापूजन, सत्संग, पठण, स्वच्छता, सजावट, information hub अशा तब्बल १९ कमिटी बनवल्या होत्या. प्रत्येक कमिटीची जवाबदारी नवीन मुलांना दिली गेली त्यांच्या मदती साठी जुने DMV होतेच. सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून त्या प्रमाणे काम केले गेले. त्यासाठी मिटींग्स, प्राक्टिस सगळे चालू होते आणि ह्या सगळ्यात मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः स्वप्निल्सिंह बरोबर होतेच. तसेच हा कार्यक्रम संध्याकाळी सर्व भक्तांसाठी खुला असणर हे सांगण्यात आले त्यामुळे सर्वाना परेडची नीट माहिती मिळावी म्हणून 'Information hub ' तयार करण्याचे ठरले. सर्व तयरी मध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे इथे पूर्ण मुंबई आणि नवी मुंबई मधली सर्व परेड केंद्रे सहभागी होती. अगदी नालासोपारा पासून कळंबोली आणि डोंबिवली पर्यंतची सगळी मुळे तयारी मध्ये सहभागी होती. कोणीच वेळेचे, कामाचे, दूर राहण्याची कारण नाही दिले. तसेच अगदी लांब राहणार्यांसाठी जवळ राहणारी मुले त्यांना घरी जायला सांगून स्वतः थांबायची. त्यांची प्राक्टिस आधी घायचे आणि अगदी उशीर झाला आणि कोणी मुलगी एकटी जाणार तर तिला स्वतःचे स्टेशन नसताना मध्ये उतरून घरापर्यंत सोडून यायचे.

बापूंना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी काही DMV ची निवड झाली. संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात जितके टेन्शन आले नव्हते त्याहून अधिक टेन्शन आमंत्रणासाठी DMV ना निवडताना आले कारण तब्बल २००- २५० DMV पैकी फक्त १० जणांना संधी मिळाली होती. त्यातही पुढच्या वर्षी इतर DMV जातील हे आश्वासन मिळाल्यावरच हायसं झाले आणि १० जणांची निवड केली गेली. ह्यात सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे इतर कुठल्याच DMV ने मला जायला मिळाला नाही म्हणून खंत व्यक्त केली नाही जो तो माझ्या मित्राला/ मैत्रिणीला जायला मिळाला म्हणून आनंदात होता. बापू काय बोलले त्याना भेटल्यावर काय काय केले हे सर्वांसाठी महत्वाचे होते. परेड DMV ना त्यांची priority नीट माहिती आहे. आमंत्रणावरून आठवले आमंत्रण पत्रिका सुद्धा DMV नी स्वतः बनवली होती. आणि बापूंना आवडते म्हणून प्रत्येकाने स्वताच्या हाताने सुंदरकांड मधली ओवी लिहिली होती.

बापूंना आमंत्रण दिले तेव्हा ते सुंदरकांड बघून फारच आनंदित झाले. म्हणाले की सुंदरकांड त्यांची सर्वात आवडती गोष्ट आहे, सुंदरकांड मुळे संपूर्ण जीवनच सुंदर होऊन जाते आणि मातृवात्सल्याविन्दानम मध्ये सर्व काही आहे. तसेच व्यायामाचे महत्व सांगितले. मुलांसाठी जोर आणि मुलींसाठी सूर्यनमस्कार आणि दोरीच्या उड्या (लंगडी सारख्या) हे व्यायाम सोपे, कमी वेळात होणारे आणि फायदेशीर आहेत. इतके सांगितल्यावर हे जर करणार तरच मी कार्यक्रमाला येणार हे सांगायला ते विसरले नाहीत. 

बापूंना commit करून हे सगळे निघाले ते तडक कार्यक्रमाच्या तयारीसाठी. २ दिवस पण राहिले नव्हते आणि खूप काही करायचे होते. शनिवारी रात्री जागा स्वच्छ करून, सजावट उभारून तयार होती.

सगळेच जण दुस्र्यादिवासाची आतुरतेने वाट बघत होते. आणि तो दिवस उजाडला.

त्या दिवशी काय काय केले ऐकायचे आहे? थोडे थांबा तर. त्या सोनियाच्या दिवसाची गम्मत ब्रेक के  बाद.

Tuesday, September 28, 2010

पुढच्या वर्षी लवकर या...

गणपती बाप्पा आले म्हणता म्हणता बुधवारी आपल्या घरी गेले सुद्धा. जितक्या प्रेमाने आपण बाप्पाला घेऊन येतो तितक्याच जोशात त्याला परत त्याच्या घरी पाठवतो जेणे करून तो पुढच्या वर्षी तितक्याच उत्साहाने, आनंदाने परत येईल. पण इथेच गडबड होते. 'जोश मे होश खो देना' हेच बहुतेक वेळा बघण्यात येते. धांगडधिंगा पेक्षा गदारोळ आणि हैदोस जास्त जाणवतो. त्यातच खिसेकापूपासून मवाल्यानपर्यंत सगळ्यांचीच चंगळ होते. बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या आयाबायांना त्रास देणे, दारू पिऊन गदारोळ करणे ह्या गोष्टी पण घडतात. तरुणाईचा हा बेधुंद पणा बघून जेव्हा देशाच्या भविष्याची काळजी वाटायला लागते तेव्हा पिवळ्या टोपीतून आशेचा किरण डोकावू लागतो. काय म्हणता पिवळी टोपी नाही माहित? अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या गणवेशाचा अविभाज्य भाग. पुरुषांसाठी काळी विजार आणि सफेद शर्ट व स्त्रियांसाठी काळी सलवार  सफेद कुर्ता व काळी ओढणी आणि डोक्यावर पिवळी टोपी. गणेश मुर्ती विसर्जनच्या वेळी हे कार्यकर्ते पोलिसांना गर्दी नियंत्रण तसेच ट्राफिक कंट्रोल साठी मदत करतात. एकीकडे हुल्लडबाजी करणारा जमाव किवा नुसतेच बघे, तसेच एका बाजूला गर्दी मध्ये अडकणारे साधेसुधे भाविक, अशा लाखो लोकांमध्ये हे शिस्तप्रिय कार्यकर्ते अधिकच उठून दिसतात. ह्यातील तरुण कार्यकर्त्यांची संख्या तर लक्षणीय आहे. हे सर्व कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्धतेने आपले काम चोख पार पाडत असतात. पोलिसांना पण त्यांचा आधार हवासा असतो. आपल्या सद्गुरूच्या प्रेमाखातर आणि सामाजिक भान सांभाळत हे कार्यकर्ते आपल्या सेवे मध्ये तल्लीन झालेले असतात. मग पाउस येवो अथवा कडक ऊन पडो, त्याची फिकीर त्यांना नसते. आपल्या सद्गुरूचा शब्द त्यांच्या साठी सर्वकाही असतो. कुठल्याही प्रकारचे मानधनच काय पण साधा इतरांकडून चहा- नाश्ता सुद्धा स्वीकारत नाहीत. त्यांच्यासाठी खाण्याची, जेवणाची सोय सुद्धा संस्थेतर्फेच केली जाते. सद्गुरू बापूंना अभिप्रेत असलेली निष्काम भक्तिमय सेवा करणे हेच प्रमाण मानतात. हे DMVS  अशा सामाजिकच नव्हे तर सर्व प्रकारच्या आपत्तींना सामोरे जाण्यास तत्पर आहेत. ह्या सगळ्याची गरज काय? हे तर पोलीस आणि सैन्याचे काम आहे, अशीच आपली सर्वांची धारणा असते. पण येणाऱ्या काळातील तिसरे महायुद्ध फक्त सीमेवर नाही तर घराघरातून लढले जाणार आहे ह्याची झलक आपल्याला नजीकच्या घडामोडींमधून कळत आहेतच. अशा वेळी आपण सीमेवर लढणाऱ्या जवानांवर भार न बनता, स्वतःच कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सक्षम असणे किती गरजेचे आहे ह्याची जाणीव रोजच वर्तमान पत्र उघडलं की लक्षात येते. डॉ अनिरुद्ध जोशींनी (अनिरुद्ध बापूंनी) लिहिलेल्या 'तिसरे महायुद्ध' ह्या पुस्तकात लिहिलेल्या कित्येक गोष्टी आज घडताना आपण पाहतो. त्यांचा द्रष्टेपणा व पुढील काळाची गरज ओळखूनच डॉ अनिरुद्ध जोशींनी अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची स्थापना केली आहे ती स्वतः केलेल्या अभ्यासातून आणि कष्टातून. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हेच ह्या ऍकेडमीचे ब्रीदवाक्य आहे. आणि सद्गुरू कृपेनेच ते पूर्णत्वास जाणार हे निश्चित.

Thursday, September 16, 2010

गणपती बाप्पा मोरया !!

गणपती बाप्पा मोरया !! म्हणता म्हणता गणपती बाप्पा आले आणि २ आणि ५ दिवसांचे गणपती आपल्या घरी परत ही गेले. सगळ्या सणांपेक्षा ह्या सणाचे हेच वेगळेपण आहे. हल्ली नात्यांमध्ये वाढत जाणारा दुरावा आणि स्वतःच्याच आप्तांचे न उमगणार्या भावना ह्यांची वाढत जाणारी संख्या अशा वेळी गणेशोत्सव जास्तच महत्वाचा ठरतो. आजही हा सण खूप उत्साहाने आणि मनापासून साजरा केला जातो.  इतर नात्यांमध्ये आलेला दुरावा सुद्धा कितींदा नाहीसा होतो. मनातले दुरावे बाजूला सारून सगळी मंडळी एकत्र येतात आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी.

बाप्पा ला घरी आणताना आपल्याच घरातल्या लाडक्या लेकीचा त्याहून लाडका लेक येतो म्हटल्यावर जे आनंदाचे उधाण येते सर्वाना ते खरच मनाला मोहवून टाकत. गणपती, बाप्पा कमी आणि सोनुल्याच जास्त वाटतो. त्याचे ते निरागस आणि लोभसवाण रुपडं बघूनच दैनंदिन कटकटी कुठच्या कुठे पळून जातात. त्याचे किती लाड करावे आणि नको असे होऊन जाते. त्याच्या गालावरून आणि सोंडेवरून मायेने हाथ फिरवण्यात जी आपुलकी जाणवते ती त्याला देव म्हणून लांबून नमस्कार करताना नाही जाणवत. लेकाच्या पाठोपाठ २ दिवसांनंतर येते त्याची आई गौरी. घरची लेक एका वर्षानंतर माहेरी येणार म्हटल्यावर तर घरातल्या सगळ्या आई आज्यांना तिचे किती कोडकौतुक करू असे होऊन जाते. आपण जरी तिला घरची लेक म्हणून प्रेम करत असलो तरी ती जगन्माता पार्वती आपल्या भक्तांच्या/ लेकरांच्या प्रेमाखातर स्वतःच त्यांची लेक बनून येते आणि त्यांच्या प्रेमाने तृप्त होऊन परत आपल्या लेका सोबत आपल्या घरी जाते. इतर देवांना आपण देवघरात बसवून दूर लोटले पण ह्या दोन देवताच अशा एकमेव आहेत ज्या अजून ही फक्त देवघरात नव्हे तर आपल्याच बरोबर आपल्यातलेच बनून राहतात. त्यांचे हे आचरण आपल्यासाठी आदर्श असायला हवे. भक्त कितीही श्रीमंत असो वा गरीब प्रत्येक घरात तितक्याच मनापासून बाप्पावर प्रेम केले जाते.

आणि मग जेव्हा बाप्पाची त्याच्या घरी परत जायची वेळ येते तेव्हा तो दिवस उगवूच नये असेच वाटत राहते. तरी ही आपले मनातले दुख बाजूला सारून त्याने परत लवकर यावे म्हणून त्याला वाजत गाजत 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत निरोप दिला जातो. पण ह्या उत्सवाला गालबोट लागते ते इथेच. आपण प्रेमाने आणलेल्या बाप्पाच्या मुर्ती रुपाला आपण बेदरकारपणे किनार्यावर सोडून देतो. जी मूर्ती आपण देव म्हणून पुजली तिलाच आपण हवी तशी पाण्यात झोकून देतो. प्लास्टर ऑफ प्यारीस POP पासून बनलेली ती मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत तर नाहीच उलट पाणीसुद्धा दुषित करते आणि पाण्यातील वनस्पतींना/ जीवांना सुद्धा अतिशय धोकादायक असते. कुठल्या देवाला आवडेल आपल्या नावाने आपल्याच इतर बाळांना धोका उत्पन्न झालेला? ह्यावर उपाय तरी काय? गणपती बाप्पाला घरी आणू नये? शक्यच नाही. हा उपाय नाही पळवाट झाली. ह्यावर अतिशय सोप्पा उपाय म्हणजे इको फ्रेंडली गणपती बाप्पा. म्हणजे नक्की काय? हा इको फ्रेंडली बाप्पा म्हणजे कागदाच्या लगद्या पासून बनवली जाणारी बाप्पाची मूर्ती. कागदाचा लगदा, डिंक आणि खाद्य रंगापासून बनवली जाणारी ही मूर्ती अजिबात प्रदूषण करत नाही. उलट पाण्यात लगेच विरघळते आणि माशांसाठीसुद्धा हा लगदा खाद्य बनतो. वजनाला खूप हलकी आणि सौंदर्य आणि फिनिशिंग पण अगदी POP नी बनवलेल्या मुर्तीसारखेच. तसेच सध्या वापरल्या जाणार्या पद्धतीनुसार ह्या मूर्ती तब्बल ११ फूट उंच बनवता येतात. त्यामुळेच इको फ्रेंडली गणपतींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पण अजून ही सामान्य लोकांच्या मनामध्ये माहितीच्या अभावी आणि पूर्वापार चालत आलेली POP च घट्ट आहे. पण लवकरच हे चित्र नक्कीच बदलेल अशी चिन्ह आहेत. कारण ह्या वर्षी श्री अनिरुद्ध उपासना फौंडेशनने तब्बल ६००० इको फ्रेंडली गणपती मूर्तींचे वाटप केले. अतिशय सोप्प्या पद्धतीने बनणाऱ्या ह्या मूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ह्या मूर्तींमध्ये कागद वापरला जातो तो रामनाम लिहिलेल्या वह्यांचा. त्यामुळे ह्या मूर्त्यांमध्ये पवित्र स्पंदन पण वाढलेली असतात. तसेच कार्यकर्ते आपले घरदार, नोकरी-व्यवसाय सांभाळून कुठलेही मानधन न घेता दिवस रात्र एक करून ह्या मूर्ती बनवतात. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या समधानाची तर गोष्टच वेगळी. इको फ्रेंडली गणपती मुळे प्रदूषणाचा एक प्रश्न तर सुटला. पण जो पर्यंत POP च्या मूर्ती बनणे पूर्णपणे थांबत नाही तो पर्यंत विसर्जनानंतर किनार्यावर येणाऱ्या भग्न अवशेषांचे आणि पसरणाऱ्या प्रदूषणाचे काय? त्या साठी सुद्धा अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे कार्यकर्ते गणेश मूर्ती विसर्जनाच्या दुसर्या दिवशी सर्व प्रमुख समुद्र किनार्यांवर गणेश मूर्ती पुनर्विसार्जनाची सेवा करतात. गौरी गणपती मूर्ती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी हे कार्यकर्ते किनार्यावर येणाऱ्या मूर्त्यांना खोल पाण्यात सोडून येतात जेणे करून किनार्यावर त्या येणार नाहीत आणि पाण्यात विरघळायला वेळही मिळेल. तसेच किनार्यावरील निर्माल्याचा झालेला कचरा सुद्धा काढून समुद्र किनारा स्वच्छ करतात. अशा प्रकारे हा गणेशोत्सव आपण साजरा केल्यास आपल्या बाप्पाला नक्कीच जास्त आनंद होईल नाही का? आणि तो आणखीन मनापसून आनंदाने पुढल्या वर्षी  येईल.

Monday, August 30, 2010

Sunday, August 22, 2010

Shree Ranachandika Prapatti

Shree Ranachandika Prapatti

Shree Ranachandika Prapatti may be performed on any Monday of the month of Shravan. This year the dates are 16, 23, 30 – Aug and 6 – Sep 2010.

Any man who has completed sixteen years of age can perform the Prapatti.

Set – up for performing Prapatti

A Shraddhavan should have a photo of Shree Trivikram (any size), a banana and a mixture of curd and sugar to be offered as Prasad, and fragrant flowers for offering to Shree Trivikram.
A Shraddhavan should take a bath before commencing the Prapatti.
The Prapatti is to be performed only after sunset.
Shree Ranachandika Prapatti is not to be performed in a group; it has got to be done individually.

The procedure:
·        After a bath and dressed in Shraddhavan attire, sit before the image of the Trivikram and recite the Shreegurukshetram mantra nine times.
·        Then recite the mantra ‘Om namashchandikaayay’ 108 times.
·        Now placing the image of the Trivikram on the head, recite the Shreegurukshetram mantra nine times all over again.
·        Thereafter, offer the Trivikram, a naivedya of banana and a mixture of curd and sugar. The banana and the curd-sugar mixture are to be offered in separate bowls.
·        The person performing the Prapatti should eat a spoonful of the curd-sugar mixture and then offer only the banana as prasad, to both the men and the women in the family.
·        The Shraddhavan should then come back and sit before the Trivikram and eat all of the remaining curd-sugar mixture, while looking at the Trivikram all along.
·        Offer fragrant flowers to the Trivikram
·        Lastly, offer the lotangan.

The above mentioned details can be found between pages 41 to 51 of the booklet on the Ram Rajya discourse by Param Poojya Sadguru Shree Aniruddha Bapu
--------------------------------------------------------------
Certain queries have been raised and clarifications sought by Shraddhavans which are addressed herebelow:

1) Shree Ranachandika Prapatti is only for gents, which can be performed on any one Monday in the month of Shravan. If one so wishes, the Prapatti can be performed on all Mondays; it is not compulsory. The Prapatti should be performed only once on any of the Mondays.
2) Shraddhavan's dress code is compulsory while performing Shree Ranachandika Prapatti.
3) One can burn the incense sticks (Dhoopshikha) while performing Shree
Ranachandika Prapatti.
4) Using of a mat (Aasan) while performing Shree Ranachandika Prapatti is optional.
5) The Prasad consisting of curd-sugar and bananas can be kept in front of the photoframe from the very start of the Prapatti.
6) The Trivikram photo of any size can be used while performing Prapatti,
7) While taking a bath prior to performing Prapatti is compulsory, taking a head bath is optional.
8) A common photo of Trivikram can be used by all the male Shraddhavans in a family performing the Prapatti. However, they should not be sitting together; rather they should be seated at a comfortable distance from each other. Also, each Shraddhavan should have his own separate Prasad.
9) Any Shraddhavan who is unable to sit on the floor because of physical limitations may sit on a chair while performing the Prapatti.
10) Shree Adimata Chandika Mahishasurmardini’s photo can also be kept alongside the photo of Shree Trivikram while performing Prapatti.
11) If the photo of Trivikram used while performing Prapatti is large in size, then a smaller photo may be used for bearing it on the head.
12) After completing the Prapatti, Shraddhavans may perform Shree Mahishsurmardini Aarti; the same is not compulsory though.

|| Hari Om ||


Friday, August 20, 2010

मी आणि परेड

ह्या शीर्षकात मी आधी आणि परेड नंतर असे लिहिलेले आहे कारण आपण सामान्य माणस. आपल्या साठी महत्वाचे आपण स्वतःच असतो व इतर गोष्टी नंतर येतात पण त्यातल्याच काही गोष्टी अशा असतात ज्या नसत्या तर आपण कुठे असतो ह्याची आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही. 

माझ्यासाठी परेड ही अशीच एक गोष्ट आहे म्हणून आज पर्यंत परेडने मला जे काही दिले ते सगळे तुम्हाला सांगायचे आहे. हे मांडायचे कारण एकच- आपण आपल्या तर्क कुतर्कांमुळे देवाने दिलेल्या बर्याच गोष्टी/ संधी गमावत असतो. पण कधी कधी आपल्याच मित्रांच्या अनुभवातून आपण नवीन गोष्टी शिकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परेड मला जे आज पर्यंत देत आली आहे त्याची भरपाई करणे तर शक्य नाही पण ही परेड माझ्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचावी हीच इच्छा व त्यासाठी ही लेखमाला.    

ह्या लेखमालेतून आपल्या समोर माझे परेड मधले अनुभव, सुरुवात, आता पर्यंतचा माझा आणि परेड प्रोजेक्टचा प्रवास मला पुन्हा एकदा माझ्या वाचक मित्रांबरोबर करायचा आहे. सुरुवात अर्थातच स्वतः पासून आणि मग हळू हळू परेड प्रोजेक्ट पर्यंत असा लेखमालेचा मार्चपास आपण करणार आहोत. पण आधीच सॉरी हं कारण परेड मध्ये आधी तेज चल आणि मग धीरे चल शिकवले जाते आणि इथे मात्र आपले अनुभवांचे मार्चपास धीरे चल पासून तेज चल पर्यंत जाणार आहे. 

तर माझ्यासाठी परेडची सुरुवात झाली आत्मबल विकास वर्ग २००३ इथपासून. 

आश्चर्य वाटले? विषय परेड आणि सुरुवात आत्मबल वर्ग २००३??
 
त्याचे झाले ते असे...

आत्मबल वर्गात प्रवेशासाठी आधी फॉर्म भरून घेतले जातात. मी देखील नंदाई स्वतः क्लास घेते हे ऐकून आपण ही हा क्लास करायचा ह्या विचाराने फॉर्म  भरण्यासाठी जून २००३ मध्ये हैप्पी होमला पोहचले. तिथे फॉर्म मध्ये एक प्रश्न होता की संस्थेतील कुठल्या उपक्रमामध्ये भाग घ्यायला आवडेल. मी लिहिले AADM आणि अहिल्या संघ कारण १३ कालमी योजना सुरु झाली होती आणि हे दोन विषय माझ्या जास्त आवडीचे होते. पण माझी आत्मबल मध्ये काही निवड झाली नाही. तेव्हा बापू आणि आई स्वतः आत्मबल साठी निवड करतात असे कळले होते. त्यामुळे बापू आईने माझी त्या वर्षी निवड का केली नाही ह्या विचाराने खूप वाईट वाटले कारण पुढे करिअर मध्ये कसा वेळ मिळेल ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण माझी निवड तर बापू आईनी करून झाली होती. त्यांनी मला खरच AADM आणि अहिल्या संघासाठी निवडले होते. लेकरासाठी काय आणि कधी द्यायचे हे बापू आणि आईला नेहमीच माहित असतेच. फक्त आपल्याला ते कळत नसते. मी हिरमुसले आणि बापूनी पुन्हा लीला केली. त्याच वर्षी जुलै महिन्यात उपासना केंद्रात ज्यांना परेड जॉईन करायची आहे अशा DMVs ची नावे मागितली गेली. मला खूपच आनंद झाला. मी लगेच नाव दिले. त्या वर्षी १५ ऑगस्टला केंद्रातून झेंडा वंदन केले. मार्चपास नव्हते पण AADM युनीफोर्ममध्ये सल्युत दिला.   

अश प्रकारे माझी परेडची सुरुवात जुलै २००३ मध्ये झाली आणि मी दर रविवारी सकाळी लवकर उठून नियमित प्रक्टीसला जायला लागले. ही अक्षरे ठळक करण्याचे पण कारण आहे. परेडची आवड लहानपणापासूंची. कॉलेज मधून NCC मध्ये भाग घ्यायची इच्छा होतीच. पण माझा आळस आणि कॉलेज मध्ये सायन्स घेतल्याचे निम्मित्त, ह्या मुळे तेव्हा NCC काही जॉईन केली नाही. पण रुखरुख मात्र कायम होती की आळसामुळे मी मोठी संधी गमावली आणि ते प्रकर्षाने जास्तच जाणवले जेव्हा सायन्समध्ये मन रमेना म्हणून बारावी नंतर तेरावीला डायरेक्ट कॉमर्सला अडमिशन घेतली. तेव्हा वेळ भरपूर मिळाला पण NCC ची संधी आणि वेळ गेली होती. ह्या संधी बरोबरच अजून एक मोठी संधी मी पुढे गमावणार होते ज्याची मला कल्पना ही नव्हती. ती कुठली ते पुढे येणारच आहे. 

तर अशी माझी परेड प्रक्टिस सुरु झाली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला घरून जराही विरोध कोणीही केला नाही. माझी आई स्वतः कॉलेज मध्ये असताना परेड मध्ये भाग घ्यायची म्हणून तिच्यासाठी तर ही अभिमानाची गोष्ट होती. ऑक्टोबर २००३ पर्यंत सगळे नीट चालू होते आणि एक दिवस अचानक AADM मधून पुन्हा निरोप आला की ज्यांना अनिरुद्ध पौर्णिमेला परेड मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी रविवारी सकाळी ७ वाजता विख्रोळी येथील विकास हायस्कूल मध्ये जमावे.... 

आणि तिथे जे काही पुढे झाले ते पुढील भागात...
   

Wednesday, August 11, 2010

Meter Jaam

Its all over the place at the moment- radios, newspapers, local trains, buses, everywhere. The 'Meter Jaam' to be followed on Thursday, the August 12, 2010 is the hottest topic in the city. 

Three young advertising professionals Abhilash Krishnan, Rachna Brar & Jaidev Rupani, launched a non cooperation movement against the autocracy of the auto-rickshaw and taxi wallas in the city. The recent hike in the minimum fare of the Auto-rickshaws and taxis is taking the common man for a ride in the literal sense. Not only are the meters adjusted to run fast, but also the auto and taxi wallas are reluctant to take small distance passengers. 

How far the initiative has its effect, only Thursday will tell. But the it definitely is a step forward to put forth the common man's agony against the 'what can i do alone' attitude.

On the pretext of hike in the prices of CNG, Bombay Autorickshaw and Taximen's Unionhad called for a strike on June 22, 2010 to support their demand for hike in auto and taxi fares. The strike succeeded with a hike in the auto and taxi fares in Mumbai and Thane with effect from June 24, 2010. The minimum fare has gone up y Rs.2 and Rs.1.50 for every subsequent kilometer.

TEJASWINI SAWANT

The new pearl in the necklace of Mother India who has succeeded in grabbing the Gold at the World Shooting Championships at Munich in 50m rifle prone event. The pearl shines all the more with the World Record set in her name at the same time.

Away from the facilities of a metropolitan city like Mumbai, Tejaswini never gave up her practice or dedication towards the game. It is more interesting to know that inspite of inadequate facilities for training, she managed to continue with a very unusual sport, and achieve the best in it.

Tejaswini is really cool and level headed. After the success and accolade she is now heading confidently for the Common Wealth Games, beginning this October. Coming from a city like Kolhapur (Maharashtra) she has proved to all that dedication and jest can make wonders. 

After the initial applauds of prizes and felicitations, the Government should look more seriously into providing more advanced facilities for sports. Also the upcoming sportpersons need to be given more support and advanced equipments for training.

Tuesday, June 1, 2010

Tuesday, March 30, 2010

SHREE TRIVIKRAM STHAPANA

SHREE TRIVIKRAM STHAPANA AT SHREE ANIRUDDHA GURUKSHETRAM



Tuesday, 30th March 2010, the full moon day of the month of Chaitra (Chaitra Pournima) would mark the extremely holy arrival of Shree Trivikram (Trivikram Sthapana) at Shree Aniruddha Gurukshetram. On that day starting from 11:00am in the morning till 8:00pm in the evening the Abhishek ceremony would be performed on Shree Trivikram followed by the Aarti at 8:00pm.

The Abhishek ceremony would be sub-divided as follows:
1) 11:00 am to 3:00 pm - Abhishek with cow’s milk.
2) 3:00 pm to 7:00 pm - Abhishek with buffalo’s milk
3) 7:00 pm to 8:00 pm - Abhishek with pure water.

This would mark the ceremonial foundation of Shree Trivikram. Devotees can avail the benefit of offering Abhishek on Shree Trivikram with scented water from 17th April 2010.

Every Thursday at Shree Harigurugram, Sukhsavarni Prarthana is performed before Shree Trivikram after the first discourse of P.P. Sadguru Shree Aniruddha Bapu, participating in the same is considered to be extremely beneficial.
|| HARI OM ||

Sunday, March 21, 2010

Ghanta Mantra

On Thursday, 18th March 2010, Bapu explained the importance of 'Ghanta' (bell) that only Maa Mahishasurmardini uses it as her weapon. It is placed hanging from the roof at Gurukshetram. The importance of 'Ghanta Mantra' is described in 'Matruvatsalyavindanam' (page 73). The Mantra will be chanted on Thursday, 25th March 2010 during regular 'Pravachan'.

Ramnvami Utsav

This year Ramnavmi Utsav will be celebrated on Wednesday, 24th March 2010 at Shri Harigurugram. Every year Lord Ram's birthday is celebrated at 12.00 noon by singing 'Palana' (lullaby). The other major events on Ramnavmi will be:

1. Handi Prasadam

2. Abhishek

3. Talibharan

4. Akhand Jap

5. Sai Sachcharit Pathan Adhyay 23

6. Havan

Chaitra Navratri Utsav

Chaitra Navratri Utsav will be celebrated at Shri Aniruddha Gurukshetram from 16th March to 24th March 2010.
The major events which will be held every day during the Utsav are:
1. Shri Chandika Havan
2. Shubhankar Stotra Stavan (after every half hour in Param Pujya Bapu's voice)
3. Shri Datta Kaivalya Yag
4. Nandadeep Prajwalan
5. 3 Ghatt Pujan