Wednesday, October 26, 2011

अनिरुद्ध आनंदोत्सव

एक अविस्मरणीय अनुभ


जळगावच्या श्रीहरीगुरुग्राम मध्ये. काय? आश्चर्य वाटले न? परम पूज्य बापूंनी अनिरुद्ध आनंदोत्सव वेळी प्रवचनातून सांगितले की जेथे त्यांची आई उभी राहिली ते हरीगुरुग्राम. खरच अतिशय भव्य सोहळा रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०११ रोजी जळगाव येथे संपन्न झाला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमासाठी जळगाव व जवळच्या उपासना केंद्रांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. परम पूज्य बापूंचे जळगाव स्टेशनवर आगमन झाल्यावर जळगाव वासीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी अतिशय आनंद व जल्लोषात आपल्या लाडक्या देवाचे स्वागत केले.  
 

परम पूज्य बापूंच्या आगमनानंतर सर्व प्रथम अनिरुद्धाज अकॅडेमी ऑफ डीजास्टर मेनेजमेंट अंतर्गत चालणार्या परेड प्रोजेक्टच्या कार्यकर्त्यांनी परेड संचलन करत बापूंना मानवंदना दिली व बापूंनी सल्यूट देऊन ती मानवंदना स्वीकारली.
 
संचलनानंतर लगेच प्रवचनाला सुरुवात झाली व सर्व श्रद्धावानांना बापूंनी तपस्चर्या सुरु केल्यानंतर प्रथमच बापूंचे शब्द कानी पडले. त्या प्रवचनातील काही संक्षिप्त मुद्दे खालीलप्रमाणे:
१. अनिरुध्द आमचा आहे असा थोडा तरी विश्वास असेल तर स्वतःला कमी लेखू नका.
२. बापूला जात नाही. श्रद्धावानाची जी जात तीच बापुची जात
३. बापू संत नाही कारण संताना partiality करता येत नाही
४. बापू कधीच म्हणणार नाही की तुम्ही लढा मी पाठीशी उभा आहे. बापू म्हणतो लढायचं आहे न, तू जीप मध्ये बस मी जीप चालवतो.
५. आम्ही भक्ती मार्गात पुढे जात असताना मी पापी आहे असे म्हणू नका. परमेश्वराला हे आवडत नाही.
६. भक्ती करणार्यांमध्ये ताकद असते. शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, राणाप्रताप हे सगळे भक्ताच होते. अल्बर्ट ऐन्स्तैन, अल्बर्ट स्वत्झ्नेर हे पण भक्तच होते. 
७. एक तरी उदाहरण सांगा जेथे नास्तीकाने काही भले केले आहे. हिटलर ने स्वतःची आणि देशाची वाट लावली.
८. देवाची भक्ती करताना भीती बाळगू नका.
९. जीवनाचा उपभोग घ्यायला शिका चांगल्या मार्गाने.
१०. चुकत असाल, हे कलियुग आहे.
   

 
हे पण हरीगुरुग्राम आहे. जिथे माझी आई उभी ते हरीगुरुग्राम.
माझ्यावर खरंखुरप्रेम करत असाल तर तेवढ्या प्रमाणात मला तुमचे पाप द्या. पण माझी अट एकच, भगवंताला विसरू नका.
   


प्रवचनानंतर  सत्संग व दर्शनाचा कार्यक्रम झाला. बापूंना सत्संगात नाचताना पाहून सर्व श्रद्धावान अतिशय आनंदित झाले.
दर्शनाच्या वेळी सुद्धा कार्यकर्त्यांच्या शिष्टबद्ध नियोजनामुळे सर्वाना व्यवस्थित दर्शन मिळाले.

दुसर्या दिवशी कार्यकर्त्यांसाठी सत्संगाचा कार्यक्रम होता. तिसर्या दिवशी बापू जळगाव वरून निघताना सर्वांनाच खूप भरून आले होते. बापू परत कधी येणार. लवकर या हेच सगळे जण आळवणी करत होते.  मुंबई मध्ये सुद्धा बापूंचे प्रत्येक स्टेशन वर भक्तांनी अतिशय जल्लोषात स्वागत केले. 

Wednesday, September 21, 2011

बापूंची घोर तपश्चर्या


अनेक श्रध्दावानांची अजूनही व्यवस्थित उपासना होत नाही, किंबहूना गुरुमंत्राची दिक्षा बापूंकडून मिळूनही अनेक श्रध्दावानांच्या मनात अनेक तर्ककुतर्क आहेत. त्यामुळेच त्यांना ह्या गुरुमंत्राचे फळ प्राप्त होत नाही या सर्वावर उपाय म्हणून बापूंनी स्वतः घोर तपश्चर्या करण्याचे ठरविले आहे.

बापूंची ही तपश्चर्या प्रामुख्याने तीन प्रकारे होणार आहे.

१) आदिमाता चण्डिकेच्या ब्रम्हत्रिपुरसुंदरी स्वरुपाची उपासना
२) बला अतिबला उपासना
३) सावित्री उपनिषदानुसार सावित्री स्वरुपाची उपासना

या तपश्चर्येचा हेतू :

या गुरुक्षेत्रम् मंत्रावर, या गुरुक्षेत्रम् वर व बापूंवर प्रेम करणार्‍या सर्व श्रध्दावान भक्ताच्या जास्तीत जास्त चुका कमी करुन, त्यांच्यावर कर्जाच्या राशी जमू नयेत व त्याला जास्तीत जास्त क्षमा मिळावी म्हणून बापू ही तपश्चर्या करणार आहेत.

१) ही उपासना अश्विन शुध्द नवरात्रीच्या अर्थात अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते चैत्र नवरात्रीच्या अर्थात शुभंकरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमी पर्यंत चालणार आहे.

२) या दरम्यान बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचनासाठी येतीलच असे नाही. तसेच ते श्रीहरिगुरुग्राम येथे आले तरी प्रवचन करतीलच असे नाही. या तपश्चर्येदरम्यान बापू पूर्ण मुक्तावस्थेत असणार आहेत.

३) मात्र ते या तपश्चर्येच्या कालखंडात दर दिवशी कमीत कमी एकदा तरी गुरुक्षेत्रम् येथे येणार आहेत. तसेच या दरम्यान ते श्री धनल़क्ष्मी पूजन, अनिरुध्द पौर्णिमा, त्यानंतर असणारे अधिवेशन, आत्मबल कार्यक्रम, गाणगापूर दर्शन, जळगांव दौरा ई. कार्यक्रमांना मात्र नक्की असणार आहेत.

४) या तपश्चर्येच्या दरम्यान श्रीहरिगुरुग्राम येथे काही विशिष्ठ कार्यक्रम होणार आहेत. याचा प्रमुख उद्देश म्हणजे सर्व श्रध्दावानांच्या उपासनांना बळ प्राप्त व्हावे तसेच सर्व श्रध्दावान निश्चिंत, निर्धास्त व्हावेत हा आहे.

५) या तपश्चर्येनंतर बापूंच्या आज्ञेवरून परत सर्व गोष्टी सुरु होतील.

६) बापूंच्या या तपश्चर्ये दरम्यान प्रत्येक श्रध्दावान भक्ताने कमीत कमी एकदा तरी ह्नुमानचलीसा म्हणावी. व ही हनुमान चलीसा त्याने विश्वकल्याणासाठी समर्पित करावी. तसेच या तपश्चर्ये दरम्यान प्रत्येक श्रध्दावानाने स्वताला दूषणे देणे, पापी समजणे, कमी लेखणे पूर्णपणे थांबवावे. व जास्तीत जास्त वेळ भक्ती व उपासनेत घालवावा.

७) या तपश्चर्येचे फलित म्हणजे सर्वांग ब्रम्हास्त्र व सर्वांग करुणाश्रय. अर्थात जे वाईट आहे चुकीचे आहे त्याचा नाश करणारे असे ब्रम्हास्त्र व जो बापूंवर, या भारतावर प्रेम करतो त्याच्यासाठी करुणाश्रय यांची स्थापना बापू गुरुक्षेत्रम् येथे करणार आहेत.

या सर्वाचा भाग म्हणून प.पू सुचितदादांच्या आज्ञेने रविवार दि. २ ऑक्टोबर २०११ रोजी १०८ वेळा अनिरुध्द चलीसा पठणाचा कार्यक्रम श्रीहरिगुरुग्राम येथे सकाळी ९.३० ते रात्रा ८.३० वाजेपर्यंत आयोजीत केला आहे. बापूंच्या या तपश्चर्येदरम्यान प्रत्येक श्रध्दावानाला जास्तीत जास्त ताकद, निर्भयता, निश्चितता प्राप्त व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामुळे प्रत्येक श्रध्दावान भक्त यात सहभागी होऊ शकतो. तसेच येथे प.पू बापू, प.पू नंदाई व प.पू सुचितदादा यांची पदचिन्ह येथे दर्शनासाठी ठेवलेली असतील त्यावर प्रत्येक श्रध्दावान बेल व तुळशीपत्र वाहू शकतो.

" मर्दथ झटतो किती बापू माझा " खरच या बापू एवढी माझी काळजी कोणालाच नाही या माऊलीच्या या तपश्चर्येत आपण खरतर काहीच करु शकत नाही पण त्यानेच सांगितलेल्या भक्तीच्या व उपासनेच्या मार्गाने आपण यात खारीचा वाटा उचलण्याचा तरी प्रयत्न करुया.

-स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये

Wednesday, June 22, 2011

गुरुपौर्णिमा २०११

गुरुवार दि १६ जून रोजी प्रवचनात परम पूज्य बापूंनी अत्यंत महत्वाची सूचना केली.

ह्या वर्षी पासून गुरुपौर्णिमेचा उत्सव गुरुपौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त श्रद्धावान भक्तांना गुरुपौर्णिमेला आपल्या सद्गुरूंच्या पावन दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून बापूंनी ही आपल्या सर्वांसाठी सोय केली आहे.

त्याचबरोबर अजून ४ महत्वाच्या सूचना केल्या:

१. साईराम जप करत इष्टिका घेऊन ज्या स्थम्भाला प्रदक्षिणा घालतो त्या स्थंभ मध्ये बदल करण्यात आले आहेत. स्थंभ त्रिकोणी आकाराचा असेल व त्यावर तिन्ही बाजूनी परम पूज्य बापू, परम पूज्य नंदाई आणि परम पूज्य सुचीतदादा यांच्या प्रतिमा असतील आणि त्यावर मध्यभागी कमळ असून त्यात प.पू.बापूच्या मूळ सद्‌गुरुंच्या पादुका असतील परंतु त्या बंदिस्त असतील त्याचं दर्शन कोणाला घेता येणार नाही आणि त्या पादुकांच्याच शेजारी एका बाजुला पुर्वा अवधुत (१ला कुंभ) व दुसर्‍या बाजुला अपुर्वा अवधुत (२४वा कुंभ) असतील (हे दोन्ही सर्वांत श्रेष्ठ असे सिद्ध केलेले कुंभ आहेत) व त्यासोबत श्रेष्ठ अश्या गुरुंच्या पादुका ह्या दोन्हींचा लाभ प्रत्येक भक्तांस मिळणार आहे.

२. मुख्य स्टेज वर श्री नृसिन्ह्सरस्वती स्वामींच्या पादुकांचे पूजन परम पूज्य बापू, परम पूज्य नंदाई आणि परम पूज्य सुचीतदादा करणार व त्यानंतर सर्व भक्तांना पादुकांचे दर्शन घेता येईल.

३. तसेच जो त्रिविक्रम श्री हरीगुरुग्राम येथे दर गुरुवारी असतो त्याचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुजन देणगी मूल्य भरुन प्रत्यक्ष पुजन करता येईल. देणगी मूल्य रुपये ५०१/- व रुपये १००१/- असे असणार. ज्याला जे जमेल ते पूजन श्रद्धावान करू शकतो.

४. प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ३ दिंड्या असतात ह्या दिंड्या भक्तीगंगेमधुन फिरताना त्यांच्या सोबत पालखी असेल आणि त्या पालखीमध्ये पदचिन्हे असतील. त्या पदचिन्हांवर प्रत्येकाला डोके ठेवुन, हात ठेवुन नमस्कार करता येईल. ह्या पदचिन्हांशेजारीच श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे पाद्यपुजन करतानाचे जल म्हणजेच अभिषेक जलाचा गडू ठेवण्यात येणार आहे.

गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पवित्र दिवशी सद्गुरू माउलीच्या दर्शनाचा प्रत्येक श्रद्धावानाला लाभ मिळावा म्हणून तीच सद्गुरू माउली किती धावपळ करत आहे. अश्या ह्या सद्गुरू मुलीला भेटायला तिचे प्रत्येक श्रद्धावान बाळ नक्की गुरुपौर्णिमेला हजार राहणार ना?

Saturday, June 18, 2011

गुरुचरण महिना


गुरुवार दि. १६ जून रोजी प्रवचनात परम पूज्य बापूनी वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा
ह्या महिन्याचे महत्व सांगितले आणि ह्या महिन्याला "गुरुचरण महिना " असे नाव
दिले. ह्या महिन्यात कमीत कमी एक वेळा तरी एका दिवसात १०८ वेळा हनुमानचलीसाचे
पठण करावयाचे आणि इतर दिवशीसुद्धा जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा
म्हणायची किवा 'ओम श्री राम्दुताय हनुमन्ताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः' किवा
'ओम कृपासिंधु श्री साईनाथाय नमः' किवा 'ओम मनःसामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय
नमः' हा मंत्र म्हणावयास सांगितले आहे. 


Monday, April 4, 2011

शुभंकरा नवरात्र

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला आरंभ झाला. २०१० मधली अश्विन नवरात्री आणि २०११ मधली चैत्र नवरात्री ही खूप आगळीवेगळी आहे. दर १००० वर्षांनंतर हा योग येतो जेव्हा महिशासुरमर्दीनीचे ९ ही अवतार नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी तितकेच समानपणे कार्यरत असतात.

अशी ही चैत्र नवरात्र श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे साजरी केली जात आहे. प्रत्येक श्रद्धावान भक्ताने ह्याचा लाभ जरूर घ्यावा.
देवीच्या ह्या उत्सवात नऊ रात्रींचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच सद्गुरू बापूंनी नवरात्रोत्सवात रात्र जागरण अवश्य करावे असे सांगितले आहे. रात्र जागरण करताना अशुभनाशिनी स्तवनम, शुभंकरा स्तवनम, रामरक्षा, श्री गुरुक्षेत्रम मंत्र, इ. चे पठण करू शकतो. तसेच मातृवात्सल्यविन्दानम व रामरसायन ह्यांचे पठण अवश्य करावे. रात्री ९.३० ते २.३० पूर्ण वेळ करावे. पूर्ण रात्र जागरण करून पठण केल्यास अतिशय श्रेयस्कर. सद्गुरू बापूंची ग्वाही आहे की मातृवात्सल्यविन्दानम चे पठण करताना ती आदिमाता साक्षात तिथे येऊन ते पठण श्रवण करते व जिथे आदिमाता तिथे तिचा पुत्र परमात्मा असतोच असतो. त्यामुळे श्रद्धावानांसाठी ही अत्युच्च गोष्ट आहे. 

(बापूंनी सांगितले की जागरण करतेवेळी इतरांना, शेजार्यांना त्रास होऊ नये ह्याची दक्षता बाळगावी तसेच झोप येत असल्यास कडू चवीचा पदार्थ खावा. उदा. कढीपत्ता)        

Tuesday, March 1, 2011

रामराज्याचा मूळ गाभा- "ग्रामविकास"


"भारतमध्ये ७ लाख खेडी आहेत. ग्रामीण जीवनाचा विकास झाल्याशिवाय रामराज्य भारतामध्ये अवतरू शकत नाही"- अनिरुद्ध बापू (६/५/२०१०)

रविवार २० फेब्रुवारी २०११ रोजी परम पूज्य बापू, परम पूज्य नंदाई व परम पूज्य सुचीतदादा यांनी सहकुटुंब गोविद्यापीठम येथे भेट देऊन आतापर्यंत स्वप्निलसिंह व त्यांच्या टीमनी केलेल्या ग्रामविकासाच्या कामाची पाहणी केली व मार्गदर्शनही केले. त्याचाच हा सचित्र वृतांत.  

ग्रामविकासाचा श्रीगणेशा, गोविद्यापीठम येथून झाला आहे.  
फळबागेची माहिती देताना स्वप्निलसिंह व कौतुकाने ऐकताना नंदाईदिसत आहेत.
. साईसत्चरितातील २ शेळ्यांची गोष्ट आठवते न ? शेळ्यांवर माया करताना नंदाई व बापू. ह्या शेळ्या पशुपालन उपक्रमांतर्गत पाळल्या आहेत 
पशुपालन अंतर्गत पाळलेल्या वासरांवरून प्रेमाने हात फिरवताना नंदाई 


चारा वैरण अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करताना परम पूज्य बापू आणि परम पूज्य नंदाई 


परस बागेतील भाज्यांच्या लागवडीची पाहणी करताना बापू आणि नंदाई 


सेंद्रिय शेती प्रकल्पांतर्गत खत तयार करण्यात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या गांडूळना उत्साहाने न्याहाळताना बापू, नंदाई व स्वप्निलसिंह  

पाण्याच्या टंचाई वर मात करण्यासाठी बांधलेले शेत तळ्याची पाहणी करताना बापू, आई, दादा  

वनराई बंधार्यात अडवण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बापू आणि नंदाईला सांगताना  स्वप्निलसिंह 

बापू, आई आणि दादा, वनराई बंधार्याची पाहणी करताना
ही तर झाली २० तारखेची सफर बापू, आई आणि दादांबरोबर. लवकरच आपण पुन्हा भेटूया 'Aniruddha's   Insitute of Gramvikas ' संदर्भात अधिक माहिती चित्र व लेखमालेतून घेण्यासाठी.  

Saturday, January 29, 2011

२६ जानेवारी २०११- अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंट- परेड संचलन

भरपूर दिवसांच्या विश्रांती नंतर आज पुन्हा आपण भेटत आहोत. कारण ही तसेच आहे. २६ जानेवारी रोजी श्री गुरुक्षेत्रम येथे झालेले ध्वजारोहण व अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंट च्या अंतर्गत चालणार्या परेड प्रोजेक्ट चे संचलन. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. मग चीफ परेड कमांडरने मान्यवरांना रिपोर्टिंग केली व 'अनिरुद्ध पथक, दहिने से तेज चल' ही कमांड देऊन संचलनाची सुरुवात झाली. सर्व प्रथम राष्ट्रीय ध्वज मग संस्थेचा ध्वज व त्या मागे सर्व प्लाटून, अशा पद्धतीने संचलन सुरु झाले. मुंबई मध्ये एकूण ११ परेड केंद्रामधल्या २०६ परेड DMVs (८ प्लाटून) नी संचलनात भाग घेतला होता. ह्या वेळी विशेष गोष्ट म्हणजे जे आधी चीफ कमांडर होऊन गेले आहेत असे सर्व DMVs आता consultant म्हणून परेड मध्ये सामील झाले आहेत त्या मुळे पहिल्यांदाच (अनिरुद्ध पोर्णिमे व्यतिरिक्त) त्यांच्या squad ने पण संचलन केले. 

मुंबई व्यतिरिक्त पुणे (६४ द्म्व्स) , रत्नागिरी (४७ द्म्व्स) व सातारा (१५ DMVs) येथे सुद्धा अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंटच्या DMVs नी परेड संचलन केले. अनिरुद्ध पोर्णिमे नंतर सर्व परेड DMVs चा उत्साह द्विगुणीत झाला आहे. मुंबईच नव्हे तर मुंबई बाहेरील अनेक ठिकाणी परेड प्राक्टिस नियमित सुरु आहे व अनेक उपासना केंद्रांवर लवकरच सुरु होणार आहे. सध्या ३ नवीन केंद्रावर परेड सुरु झाली आहे. बापू कृपेने लवकरच इतर केंद्रांवर पण सुरु होईल. परेड चा पाया भक्कम करण्यासाठी administrative तयारी पण जोमाने सुरु आहे. त्यामुळे थोड्याच अवधीत परेडचे नवीन स्वरूप आपल्या सर्वांसमोर येईल.

परेड विषयी आपल्या गप्पा चालू राहणारच आहेत. पण तोवर परेड संचलनाच्या video वर समाधान मानूया.
 

AADM Parade 26 January 2011

Sunday, January 9, 2011

'श्रीमंगलचंडिकाप्रपत्ति'

६ में २०१० रोजी श्री हरिगुरुग्राम येथे सद्गुरु बापूनी केलेले 'रामराज्य २०२५' ह्या विशेष प्रवचनामध्ये 'श्रीमंगलचंडिकाप्रपत्ति' ह्याची सखोल माहिती दिली होती. ह्या वर्षी १५ जानेवारी रोजी ही प्रपत्ती स्त्रियानी करावयाची आहे. त्या विषयी गेल्या गुरुवारी, ६ जानेवारी रोजी सद्गुरु बापूनी भक्तांच्या शंकांचे निरसन केले. ती माहिती खाली दिलेल्या लिंक वर मिळेल.
http://manasamarthyadata.com/uploads/Queries.pdf 

http://manasamarthyadata.com/uploads/Poojan%20Arrangement.पीडीऍफ़


श्रीचंडिका उपासनेमुळेच रामराज्य सत्यात उतरणार आहे. ह्या उपासनेमध्ये ५ तत्वे खूप महत्वाची आहेत त्यातले चौथे तत्वे म्हणजेच, 'माय चंडिके, तू मला स्वतः जवळ घे आणि परमात्म्याच्या हाती सोपव', अशी चंडिकेला प्रार्थना करून ही प्रपत्ती करणे.