Saturday, January 29, 2011

२६ जानेवारी २०११- अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंट- परेड संचलन

भरपूर दिवसांच्या विश्रांती नंतर आज पुन्हा आपण भेटत आहोत. कारण ही तसेच आहे. २६ जानेवारी रोजी श्री गुरुक्षेत्रम येथे झालेले ध्वजारोहण व अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंट च्या अंतर्गत चालणार्या परेड प्रोजेक्ट चे संचलन. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. मग चीफ परेड कमांडरने मान्यवरांना रिपोर्टिंग केली व 'अनिरुद्ध पथक, दहिने से तेज चल' ही कमांड देऊन संचलनाची सुरुवात झाली. सर्व प्रथम राष्ट्रीय ध्वज मग संस्थेचा ध्वज व त्या मागे सर्व प्लाटून, अशा पद्धतीने संचलन सुरु झाले. मुंबई मध्ये एकूण ११ परेड केंद्रामधल्या २०६ परेड DMVs (८ प्लाटून) नी संचलनात भाग घेतला होता. ह्या वेळी विशेष गोष्ट म्हणजे जे आधी चीफ कमांडर होऊन गेले आहेत असे सर्व DMVs आता consultant म्हणून परेड मध्ये सामील झाले आहेत त्या मुळे पहिल्यांदाच (अनिरुद्ध पोर्णिमे व्यतिरिक्त) त्यांच्या squad ने पण संचलन केले. 

मुंबई व्यतिरिक्त पुणे (६४ द्म्व्स) , रत्नागिरी (४७ द्म्व्स) व सातारा (१५ DMVs) येथे सुद्धा अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंटच्या DMVs नी परेड संचलन केले. अनिरुद्ध पोर्णिमे नंतर सर्व परेड DMVs चा उत्साह द्विगुणीत झाला आहे. मुंबईच नव्हे तर मुंबई बाहेरील अनेक ठिकाणी परेड प्राक्टिस नियमित सुरु आहे व अनेक उपासना केंद्रांवर लवकरच सुरु होणार आहे. सध्या ३ नवीन केंद्रावर परेड सुरु झाली आहे. बापू कृपेने लवकरच इतर केंद्रांवर पण सुरु होईल. परेड चा पाया भक्कम करण्यासाठी administrative तयारी पण जोमाने सुरु आहे. त्यामुळे थोड्याच अवधीत परेडचे नवीन स्वरूप आपल्या सर्वांसमोर येईल.

परेड विषयी आपल्या गप्पा चालू राहणारच आहेत. पण तोवर परेड संचलनाच्या video वर समाधान मानूया.
 

AADM Parade 26 January 2011

Sunday, January 9, 2011

'श्रीमंगलचंडिकाप्रपत्ति'

६ में २०१० रोजी श्री हरिगुरुग्राम येथे सद्गुरु बापूनी केलेले 'रामराज्य २०२५' ह्या विशेष प्रवचनामध्ये 'श्रीमंगलचंडिकाप्रपत्ति' ह्याची सखोल माहिती दिली होती. ह्या वर्षी १५ जानेवारी रोजी ही प्रपत्ती स्त्रियानी करावयाची आहे. त्या विषयी गेल्या गुरुवारी, ६ जानेवारी रोजी सद्गुरु बापूनी भक्तांच्या शंकांचे निरसन केले. ती माहिती खाली दिलेल्या लिंक वर मिळेल.
http://manasamarthyadata.com/uploads/Queries.pdf 

http://manasamarthyadata.com/uploads/Poojan%20Arrangement.पीडीऍफ़


श्रीचंडिका उपासनेमुळेच रामराज्य सत्यात उतरणार आहे. ह्या उपासनेमध्ये ५ तत्वे खूप महत्वाची आहेत त्यातले चौथे तत्वे म्हणजेच, 'माय चंडिके, तू मला स्वतः जवळ घे आणि परमात्म्याच्या हाती सोपव', अशी चंडिकेला प्रार्थना करून ही प्रपत्ती करणे.