Tuesday, March 1, 2011

रामराज्याचा मूळ गाभा- "ग्रामविकास"


"भारतमध्ये ७ लाख खेडी आहेत. ग्रामीण जीवनाचा विकास झाल्याशिवाय रामराज्य भारतामध्ये अवतरू शकत नाही"- अनिरुद्ध बापू (६/५/२०१०)

रविवार २० फेब्रुवारी २०११ रोजी परम पूज्य बापू, परम पूज्य नंदाई व परम पूज्य सुचीतदादा यांनी सहकुटुंब गोविद्यापीठम येथे भेट देऊन आतापर्यंत स्वप्निलसिंह व त्यांच्या टीमनी केलेल्या ग्रामविकासाच्या कामाची पाहणी केली व मार्गदर्शनही केले. त्याचाच हा सचित्र वृतांत.  

ग्रामविकासाचा श्रीगणेशा, गोविद्यापीठम येथून झाला आहे.  
फळबागेची माहिती देताना स्वप्निलसिंह व कौतुकाने ऐकताना नंदाईदिसत आहेत.
. साईसत्चरितातील २ शेळ्यांची गोष्ट आठवते न ? शेळ्यांवर माया करताना नंदाई व बापू. ह्या शेळ्या पशुपालन उपक्रमांतर्गत पाळल्या आहेत 
पशुपालन अंतर्गत पाळलेल्या वासरांवरून प्रेमाने हात फिरवताना नंदाई 


चारा वैरण अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करताना परम पूज्य बापू आणि परम पूज्य नंदाई 


परस बागेतील भाज्यांच्या लागवडीची पाहणी करताना बापू आणि नंदाई 


सेंद्रिय शेती प्रकल्पांतर्गत खत तयार करण्यात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या गांडूळना उत्साहाने न्याहाळताना बापू, नंदाई व स्वप्निलसिंह  

पाण्याच्या टंचाई वर मात करण्यासाठी बांधलेले शेत तळ्याची पाहणी करताना बापू, आई, दादा  

वनराई बंधार्यात अडवण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बापू आणि नंदाईला सांगताना  स्वप्निलसिंह 

बापू, आई आणि दादा, वनराई बंधार्याची पाहणी करताना
ही तर झाली २० तारखेची सफर बापू, आई आणि दादांबरोबर. लवकरच आपण पुन्हा भेटूया 'Aniruddha's   Insitute of Gramvikas ' संदर्भात अधिक माहिती चित्र व लेखमालेतून घेण्यासाठी.